Summary of the Book
जीवत्सु तातपादेषु नवेदारपरिग्रहे ।
मातृभिश्चिन्त्यमानानां ते हि नो दिवसा गता: ।- भवभूती (उत्तररामचरित्र)
मी चाळिशीच्या घरात आलो, तेव्हा हा श्लोक जितका काव्यात्म, तितकाच वास्तव आहे, याची तीव्र जाणीव मला झाली.
बालपणीच्या आणि कुमारवयातल्या अनेक आठवणी या ना त्या कारणाने माझ्या मनात जाग्या होऊ लागल्या. हुरहुर लावून जाऊ लागल्या...
दैव, व्यक्तित्व आणि परिस्थिती या तिन्हींच्या क्रिया-प्रक्रियांतून माणसाचे जीवन कसे घडविले जाते, हे अंधुकपणे का होईना, या आठवणींमुळे कळू लागते. मग जीवनाच्या कोड्याविषयी अधिक अचंबा वाटतो !
जीवन म्हणजे काय, या प्रश्नाचे उत्तर आपण शोधू लागतो. असंख्य विसंगतींच्या सागरातून मध्येच डोके वर करून पाहणारे एक बेट, एवढाच त्याचा अर्थ आहे, हे आपल्याला कळून चुकते !