Summary of the Book
Free Audio CD inside
सुखी माणसाचा सदरा शोधूनही सापडत नाही, असं म्हणतात. तसंच भाग्याचं आहे का? लौकिकदृष्ट्या भाग्यवान ठरण्यासाठी माणसं धडपडत असतात. मात्र भाग्य बदलता येत नाही, तर आपला दृष्टीकोन बदलणं आवश्यक असतं, असं लेखक सरश्री यांनी म्हटलं आहे. आपल्या विचारात बदल घडवायचा, स्वत:ला जाणायचं आणि आपला दृष्टीकोन बदलायचा.
या तिन्ही गोष्टी साध्य केल्या तर आपण भाग्यशाली ठरू, असं लेखक म्हणतात. त्यासाठी प्रथम आपल्या डोळ्यांवर असणारी पूर्वग्रहाची पट्टी बदलायला हवी. विश्वातील प्रत्येक माणूस ख-या अर्थानं जागृत व्हावा, आणि नैसर्गिक, सहज, सुलभ जीवन जगण्यासाठी त्यानं पाहिलं पाऊल उचलावं, हा या पुस्तकाचा हेतू आहे.