Summary of the Book
गांधीजींना ‘महात्मा’ ही पदवी मिळाली. त्यांनी भारतीयांच्या हृदयात स्थान मिळविले. स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व त्यांनी केले आणि त्यात ते यशस्वी झाले. पण कौटुंबिक पातळीवर त्यांना अपयश आले. त्यांचे ज्येष्ठ पुत्र हरिलाल यांना पित्याच्या मोठेपणाचा फायदा झाला असला तरी आयुष्यात त्या कारणामुळे त्यांना दुःखही भोगावे लागले. शिक्षण व आर्थिक कुतरओढ, मद्यपान, धर्मांतर अशा अनेक गोष्टींमुळे त्यांचे नाव येत असे. गांधीजी व त्यांच्यात वैचारिक पातळीवर संघर्ष निर्माण झाला. त्यात कस्तुरबाही भरडल्या गेल्या.
या संघर्षाची कहाणी दिनकर जोषी यांनी ‘प्रकाशाची सावली’ मध्ये रंगविली आहे. मात्र ती लिहिताना दोघांपैकी एकाची बाजू घेणे टाळून दोघांमधील गुणदोष त्यांनी व्यक्त केले आहेत. तौलनिकदृष्ट्या दोघांना समान स्थान दिल्याने यातून राष्ट्रपित्याची एक वेगळी बाजू समजते. याचा मराठी अनुवाद स्मिता भागवत यांनी केला आहे.