Summary of the Book
प्रा. रा. ग. जाधव गेली अनेक दशके साहित्याविषयी लिहीत आहेत. 'संध्यासमयीच्या गुजगोष्टी' हा त्यांच्या ललित लेखांचा संग्रह आहे. हे ललित लेख यापूर्वी काही नियतकालिकांत व दैनिकात प्रसिद्ध झालेले आहेत; मात्र हे लिखाण गेल्या एक-दोन वर्षांतीलच आहे. या सर्व लेखनात जाधव यांच्या सांजपर्वातील चिंतन डोकावत राहते. सांजपर्व माणसाला "मी'विषयी बोलायला प्रवृत्त करत असते. त्यांच्या या गुजगोष्टींमध्येही "असा मी' आहे. पुस्तकाचे चार विभाग आहेत. पहिल्या विभागातील लेखांमधून रा. ग. जाधव यांच्या आयुष्यातील साहित्याचे स्थान, ललित लेखन, कथा व कवितांचा प्रवास उलगडत जातो. साहित्याच्या अनुषंगाने येणारे रा. ग. जाधव यांचे इतरही अनेक विषयांवरील लेखन या पुस्तकात आलेले आहे. हे लेख प्रासंगिक असले, तरी त्यांची वाचनीयता अजूनही टिकून आहे.