Summary of the Book
शेती एक शास्त्र आहे. त्या शास्त्राप्रमाणे शेती केल्यास ती फायद्याची ठरते याचा अनुभव अनेक शेतकर्यांनी घेतला आहे. परंतु याची अद्याप अनेकांना कल्पना नाही. म्हणूनच या पुस्तकात शेती उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक अशा उदा. माती परीक्षण, नांगरट कशी करावी, पाऊस नसल्यास काय करावे, पेरणीचे महत्व, बीजप्रक्रिया, पेरणी कधी, कशी करावी, शेतात सेंद्रिय खते कशी करावीत, तणांचे नियंत्रण, आंतरमशागतीचे फायदे, पीक संरक्षक उपाय, इ. विषयासंबंधी माहिती दिली आहे. पिकांची, झाडांची चांगली वाढ होण्यासाठी त्यांना रासायनिक खते द्यावी लागतात. परंतु ही खते परवडण्यासाठी काय करावे, पाण्याचा निचरा का व कसा करावा, उन्हाळ्यात अधिक उत्पादन का येते, वर्षातून चार पिके कशी घ्यावीत, नारळाची चांगली रोपे कशी करावी, भरपूर आंब्यासाठी मोहोर वाचविण्याचे तंत्र, फळझाडांचा बहार, फळे काढणीस योग्य झाली हे ओळखण्याचे तंत्र, पैसा देणारा भाजीपाला, परसबागेत वर्षभर भाजीपाला घेण्याचे तंत्र, फायद्याचा गोबरगॅस, टेरेसवर भाजीपाला, फुले, फळांची बाग अशा अनेक विषयांची माहिती या पुस्तकात दिली आहे. त्याप्रमाणे शेती केल्यास निश्चितच फायद्याची शेती होते. म्हणूनच सुजलाम सुफलाम महाराष्ट्र करण्यासाठी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे.