Summary of the Book
रामायण हे आदर्श जीवनाचे प्रतिक मानतात. मर्यादा पुरषोत्तम श्रीरामाच्या जीवनातील या घटनांमधून माणसला बोध मिळतो. रामायणातील प्रसंग साधे वाटत असले तरी त्यात अनेक रहस्य दडलेली आहेत, असे सरश्री यांचे म्हणणे असून, ती शोधण्याचा प्रयत्न त्यांनी रामायण रहस्य मधून केला आहे. पहिले रहस्य उलगडताना रामायणातील पूर्वलीला म्हणजे विष्णूंनी रामाचा अवतार घेण्यापासूनची कथा सांगून त्यामागे दडलेला अर्थ सांगितला आहे.
खंड एक मध्ये रावणाची ओळख होते. त्यात शूर्पणखेचे कोडे समजावून सांगितले आहे. शूर्पणखा म्हणजेच माया. तिच्या आधीन झालेल्या मनुष्याचे वर्णन यात आहे. रामायणातील सोनेरी हरणाचे रहस्य व त्याचा मनुष्यावर होणारा परिणाम या गोष्टी येतात. खंड दोनमध्ये महारथी जटायूच्या रूपाने प्रत्येक कार्य मन लावून कसे करावे, प्रयत्नांचे महत्व, भक्तीतील गोडवा, सत्य व असत्यमधील फरक समजाविला आहे.
तिसऱ्या खंडात शंकांचे समाधान करताना पृथ्वी जीवनाचे रहस्य, समस्या व विकास, बाली - सुग्रीवाच्या कथेतून दुःख व मनाचा भ्रम, हनुमान - राम भेटीतून ईश्वर - भक्तांचे प्रथम मिलन कसे असते, हे स्पष्ट केल आहे.