Summary of the Book
श्री. हुसेन दलवाई यांच्या आठवणींचा जो काळ आहे त्यात अनेक रोमांचकारक घटना घडल्या. नवी घडी बसली किंवा बसवण्याचे निकराचे प्रयत्न झाले. अशा इतिहास घडवणाऱ्या काळाचे ते साक्षीदार आहेत. त्यांच्या तटस्थ वृत्तीमुळे त्यांची साक्ष महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने हे पुस्तक हा त्या कालखंडाचा मोलाचा दस्तऐवज आहे.
सार्वजनिक जीवनात इतक्या गुंतलेल्या श्री. दलवाईंची तशी गुंतवणूक खासगी जीवनातही होती व आहे. शेवटी मनावर ठसा उमटतो तो एका राजकारणी-समाजकारणी माणसाइतकाच एका कुटुंबवत्सल माणसाचा. प्रेमळ, मृदु माणसाचा. राजकारणाच्या धबडग्यातही इतकी कोवळीक जपावी हे मोठेपणाचे लक्षण होय.
वाङ्मय म्हणून या आठवणी सुंदर जमल्या आहेत. त्यांच्यात सहजपणा आहे.
मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांच्या प्रस्तावनेतून