Summary of the Book
लोकशाहीत प्रशासनाचे अनन्यसाधारण महत्व असते. कारण
केवळ कायदे करून, नवीन ध्येयधोरणांचा घोषणा करून लोकांचे
समाधान करता येत नाही; तर ते कायदे, ध्येयधोरणे प्रत्यक्षात उतरविणे जरूर
असते. याबाबतीत स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या पाच दशकातील चित्र
निराशाजनकच आहे. 'शासन आपल्या दारी' अशा घोषणा अनेकदा फसव्या
ठरल्या आहेत.
प्रशासनाबाबत निष्कारण एक गुढवलय तयार करण्यात आले आहे. म्हणूनच
सर्वसामान्य माणसाला प्रशासन अगम्य वाटते. त्याचे 'डीमिस्टिफिकेशन'
झाल्याशिवाय प्रशासनावर जनतेचा वचक राहणार नाही. हे साध्य करायचे
असेल तर प्रशासनाचे विविध पैलू लोकांना साध्या, सोप्या भाषेत उलगडून
दाखवावे लागतील.
डॉ. माधव गोडबोले यांचा १९९७ चा हा संग्रह प्रशासनाच्या विविध अंगांवर प्रकाश टाकतो.