Summary of the Book
‘न लिहिलेली पाने’ हा सुकन्या आगाशे यांचा दुसरा कथासंग्रह. यातील कथापटांवर जीवनाचे जे रंग उतरतात त्यातील वैविध्य प्रकर्षाने जाणवतं. आशयानुसार लवचिक बनणारी शैली हे या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. ही शैली अल्पाक्षरी व अचूक शब्द योजणारी आहे. या कथा आधुनिक शहरी जीवनाचा व त्यात रुजलेल्या माणसांच्या मनांचा वेध घेतात तसाच प्राचीन वाङ्मयातील व्यक्तिरेखांच्या उक्ती व कृतींचा अन्वयार्थही लावण्याचा समर्थ प्रयत्न करतात. या कथा वाचताना लेखिकेला असलेले सामाजिकतेचे भानही जाणवते मग कथेची विषयवस्तू व आशय कोणताही असो.
न लिहिलेली, पाने हा कथासंग्रह असे अनवट रंगाने रंगविलेले दर्शन घडवितो.