Summary of the Book
``ऋतू बदलला की मला नेहमी खंडाळ्याची आठवण येते. वसंत ऋतू आला की, खंडाळ्याच्या रानात काटेसावरीची, पळसाची, पांगार्यांची, मोहाची आणि सरतेशेवटी गुलमोहराची झाडं फुलांनी अथांग बहरून जायची. करवंदीच्या जाळ्यांवर चमेलीसारखी नाजूक फुलं फुलायची आणि त्यांचा मधुर सुगंध सारखा हुंगावा असं वाटायचं. कुडाच्या झाडावर पांढर्या फुलांचे घोस डवरायचे. आंब्याला मोहोर यायचा. आंब्याला तसाच काजूलाही. त्याचा उन्मादक वास रानभर दरवळायचा. पहाटेच्या वेळी कोकिळा आर्त स्वरात हाका मारत सुटायची. एकदा वसंत ऋतूत खंडाळ्याला आंब्याच्या झाडावर मी एक फार सुंदर पक्षी पाहिला होता. सोनेरी रंगाचा, लहानगा, परीकथेत असतो तसा. त्याची शीळ तर इतकी मधुर होती की जशी. श्रीकृष्णाची बासरीच. ती शीळ ऐकूनच मी वेडावले आणि त्याचा शोध घेत धावत सुटले.’’