Summary of the Book
निसर्गातले सर्व ऋतू आपल्या आयुष्यातही वेगवेगळी रूपे घेऊन प्रगटत असतात. कायमचं वसंत थांबत नाही; तसा सतत निष्पर्ण शिशिरही नसतो. एक क्षणातून नवा क्षण हळुवारपणे ढळत असतो, तसा नव्याने बहरतही असतो.
हे शिशिर - बहर दोन्हीही उत्कटतेने टीपणं साधलं की आयुष्य बरंचसं सुसह्य होतं. आज चोहीकडून नकारात्मक प्रवाहाचा, अपेक्षांच्या अनावर ओझ्यांचा इतका मारा लादला जातोय की त्यामुळे हे बहर टीपणंच राहून जातं.
हे बहरक्षण प्रस्तुत ग्रंथातून अगदी साध्या साध्या घटनांत सहजपणे सामावलेले आहेत. कधी प्रसंगामधून, कधी व्यक्तींच्या वेगळ्या दृष्टिकोनातून वाचकांना जगण्याचा वेगळा दृष्टीकोन निश्चित लाभतो.