Summary of the Book
नात्यांची वीण घट्ट करण्यासाठी काय करायचे, असा प्रश्न असेल, तर त्याचे उत्तर म्हणजे सोनेरी नियम पाळायचे. हे सोनेरी नियम कोणते, ते या पुस्तकातून समजेल. सरश्री यांनी या पुस्तकात नात्यांमध्ये खुश राहण्याचे नियम सांगीतले आहेत.
'मी'पासून 'आपण' बनण्याची कला शिकायला हवी, असे ते म्हणतात. 'नाती दृढ कशी बनतील' या विभागात नात्यांमधील अहंकारावर ते प्रकाश टाकतात. 'पूर्णता आणण्यासाठी प्लॅटफॉर्मची निर्मिती या विभागात नात्यांमधील प्लॅटफॉर्मबद्दल ते सांगतात.
परिवाराचा पाया हा पती - पत्नी हा असतो आणि एकमेकांचे स्वभाव जाणून एकविचाराने संसार करावा लागतो. पाचव्या विभागात नात्यांमधील पेचांमधून मुक्ती मिळवण्यासाठी काय करावे, याचे उत्तर दिले आहे. याशिवाय विविध प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून नात्यांची दृढता व्यक्त केली आहे.