Summary of the Book
कथा वेगळी, तिचं सूत्र वेगळं; तरीही या सर्व कथांना जोडणारा समान दुवा म्हणजे अमृतराव आणि कौशिक. "वौज्ञानिक तंत्रज्ञानाच्या आधारे उलगडत जाणारी कोडी' हे या कथांचे खास वौशिष्ट्य! कथेत घडणारे गुन्हे, खून, त्यामुळे निर्माण होणारे गूढ, रहस्यमय वातावरण यातून पुढे काय होणार? ही उत्कंठा तगवून ठेवण्यात सर्वच कथा यशस्वी ठरतात. गंभीर विषय असूनदेखील कौशिक आणि अमृतरावांची मिश्किल जुगलबंदी चांगलीच रंगते. बाळ फोंडकेंचे हे मानसपुत्र केवळ पोलीस न ठरता दोन संवेदनाशील व्यक्तिमत्त्वे म्हणूनही वाचकाला जवळची वाटू लागतात, हे या कथासंग्रहाचे खरे यश! मनीषा खौरे