Summary of the Book
"ज्या मानवजातीसाठी बुद्धांनी जीवनातील एक्कावन्न वर्षे अपार कष्ट घेतले ती मानवजात-प्रामुख्याने ज्या भूमीत ते जन्मले त्या भूमीचे पुत्र त्यांना आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाला नास्तिक ठरवून फार अन्याय करत आहेत. बुद्धांनी भल्याभल्या नास्तिकांना आस्तिक केले, असे मला वाटत होते. अशा परमद्रष्ट्याला त्याच्या जन्मभूमीने हिंदुविरोधी वा दलितांचा देव समजावे ही अन्यायाची चरमसीमा आहे. गुजराती भाषेत बुद्धांच्या संदर्भात फार कमी साहित्य प्रकाशित झाले आहे. म्हणून इतर भाषांत-इंग्रजी आणि हिंदी भाषांत प्रगट झालेले साहित्य अभ्यासून बुद्ध आणि बुद्ध तत्त्वज्ञानाविषयी लिहिण्याचा विचार मनात रुजला. त्याचेच हे फलित! माझा पिंड कादंबरीकाराचा! कादंबरीकाराने मूलभूत अभ्यास वा मनातील भावनेस शब्ददेह दिला तर ते कथन भिंत फोडून उगवणार्या पिंपळासारखे कादंबरीरूपानेच प्रगट होणार! त्यामुळे तत्त्वतः ही कादंबरी असूनही ती बुद्धजीवन आणि बुद्धदर्शन- तत्त्वज्ञान सामावून घेण्याच्या उद्देशाने लिहिली आहे.’’
- दिनकर जोशी