Summary of the Book
मनुष्य आणि निसर्ग यात द्वंद्व सुरु आहे. मात्र स्वतःच्या सुखासाठी निसर्गाला ओरबाडणारा माणूस निसर्गाचे रौद्र रूप पाहतो तेव्हा मुळापासून हादरून जातो. ३० सप्टेंबर १९९३ च्या मध्यरात्री लातूर-उस्मानाबाद परिसरात झालेल्या भूकंपाने नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय, याचा अनुभव महाराष्ट्राने घेतला. प्रचंड जीवित व वित्तहानी यात झालीच, पण माणसांची माने कोलमडली. भूकंप झाल्यावर या भागात सरकारी यंत्रणा मदतीला धाव्लीच, शिवाय चोहोबाजूंनी मदतीचा ओघ सुरु झाला.
स्वयंसेवी संस्थांचा यात वाटा होता. पण काल पुढे सरकला आणि मदतीचे, मदत करणाऱ्यांचे रंगही बदलले. स्वार्थी वृत्तीच्या माणसांचे, संस्थांच्या वर्तणुकीच्या वेगवेगळ्या छटा दिसू लागल्या. या सर्व गोष्टींचे कथान अतुल देऊळगावकर यांनी डळमळले भूमंडळ मध्ये केले आहे. त्यांनी तेथे काम केल्याने त्यांचे अनुभव वास्तव आहेत.