Summary of the Book
'वार्याने हलते रान' या ललित लेखसंग्रहात कवी ग्रेस यांनी पुराणकथांच्या, दंतकथांच्या, लोककथांच्या, परीकथांच्या, कधी स्त्रीत्वाच्या आलंबन विभावांच्या, तर कधी स्मरणकथांच्या किंवा अगदी प्रहर व ऋतूंच्याही अनुषंगाने, अखेर निर्मिती व निर्मितीप्रकियेचा वेध घेतला आहे. हा वेध घेताना ग्रेस या निर्मितीप्रकियेच्या संदर्भात एक तत्त्व मांडतात ते असे-
''कला ही जीवनाची पुनर्निर्मिती आहे. थेट निर्मिती सदोष राहणारच, पुनर्निर्मिती सदोष राहणार नाही, तर तिचा कल अपर्यायी परिपूर्णतेकडे झुकणारा असेल... पूर्णाकृती पुनर्निर्माणाच्यासाठी, कलावंताला जीवनाची समग्र सामग्री, कृतज्ञतापूर्वक उचलूनही, जीवनाशीच कायमचे ताटातुटीचे, हेतुपूर्ण क्रूर अनुसंधान जुळवावे लागते.''
कवी ग्रेस यांच्या या ललितबंध संग्रहाला साहित्य अकादेमी २०११ चा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.