Summary of the Book
जगण्याच्या मातीत विविध नातेसंबंधांनी समृद्ध होत रुजणं , वाढणं , फुलणं आणि बदलणं ह्या माणसाच्या नैसर्गिक क्रियेबद्दल लेखिकेला कुतूहल आहे. भोवतालच्या पर्यावरणाला सतत प्रतिसाद देत बदलत वाढत जाणारा माणूस तिला सुट्या बेटासारखा कधीच वाटत नाही. त्यामुळे ' पूल ' या पहिल्या कादंबरीतसुद्धा माणसा-माणसांमधील गुंतागुंतीच्या नात्याचा शोध , त्याचं घडणं , मोडणं आणि पुन्हा नव्याने घडणं या सगळ्याचा सखोल वेध लेखिकेने ' रेवती ' या केंद्रवर्ती पात्राच्या माध्यमातून घेतला आहे.