Summary of the Book
पतीच्या मृत्यूनंतर पतीच्या चितेबरोबरच स्वतःला जाळून घेण्याची म्हणजेच सती जाण्याची प्रथा इसवी सनाच्या सातव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत चालू होती. या प्रथेमध्ये धार्मिक विधीच्या नावाखाली अनेक स्त्रियांना जाळले गेले.
देशात सतीबंदीचा कायदा १८२९ साली लागू झाला. सतीप्रथेचा अंगावर काटा आणणारा आणि डोळ्यात पाणी आणणारा इतिहास लेखक ह. अ. भावे यांनी या पुस्तकात सांगितला आहे. सती-प्रथा प्राचीन हिंदू धर्मात नाही.
असे ते सांगतात. मात्र, पुरुषसत्ताक पध्दती अंधश्रद्धा आदी कारणांमुळे या वाईट प्रथेला सुरवात झाली. १८व्या शतकात सती गेलेल्या स्त्रियांची आकडेवारीही त्यांनी पुस्तकात दिली आहे; तसेच राजस्थानात क्रूर पद्धत कशी होती, याची शहारे आणणारी माहिती ते देतात. संदर्भग्रंथ म्हणून हे पुस्तक उपयुक्त.