Summary of the Book
डॉ. संभाजी खराट पत्रकार लेखक असून, आतापर्यंत त्यांची 18 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. एखादा विषय निवडला की त्यांचा पाठपुरावा करून, संशोधन करून पुस्तक लिहिणे ही खराट यांची खासीयत. आपत्ती व्यवस्थापन या विषयातही त्यांनी अशीच सखोल माहिती घेऊन शासकीय अधिकारी, सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिक यांना उपयोगी पडेल असे हे पुस्तक लिहिले आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे 2006 या एका वर्षात जगभरात 20 हजार लोकांचा बळी गेला आणि 45 अब्ज डॉलरची हानी झाली. ही आकडेवारी धक्कादायक आहे. अपघात झाल्यावर किंवा नैसर्गिक आपत्ती ओढवल्यावर बाहेरून येणारी मदत त्या ठिकाणी जाईपर्यंत स्थानिक नागरिकच महत्त्वाचा असतो. त्याला आपत्ती व्यवस्थापनाचे तंत्र समजणे अधिक महत्त्वाचे आहे. सात प्रकरणांमध्ये लेखकाने आपत्ती व्यवस्थापन आणि त्याचा कायदा याबाबत सविस्तर विवेचन केले आहे.