Summary of the Book
माणसाच्या मुलभूत गरजा भागल्या, की त्याला खेळ अन मनोरंजन हवेसे वाटते. खेळाला आयुष्यात मोठे महत्व आहे. निरोगी आयुष्यासाठी, कणखर मन, मजबूत शरीरयष्टी खेळांमुळे तयार होत असते. अथेन्समध्ये पहिले ऑलिंपिक झाल्यानंतर त्याची वाटचाल २१ व्या शतकातही सुरु आहे. भारतात अजूनही क्रीडा विश्वाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, ही वस्तूस्थिती आहे.
मात्र आता क्रिकेट सोडून टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, तसेच मैदानी स्पर्धांचे आकर्षण वाढू लागले आहे. भारत व एकूणच क्रीडा जगताचा आढावा अनंत मनोहर यांनी 'रोमहर्षक क्रीडाविश्व'मध्ये घेतला आहे. भारताचे क्रीडाविश्व, क्रीडा क्षेत्राला लागलेली भ्रष्टाचाराची कीड, जागतिक खेळाडूंची आत्मचरित्रे, विविध ऑलिंपिकच्या आठवणी, क्रिकेटचा ज्वर याबद्दल यात वाचायला मिळते.