Summary of the Book
ताणतणाव, काम व कुटुंब यामध्ये होणारी कसरत, व्यवसाय व नोकरीतील जीवघेणी कसरत यात माणूस पुरता दमतो, शिणतो, बैचन, अस्वस्थ होते. स्वास्थ्यपूर्ण, मनशांती, प्रसन्न आयुष्याची गरज सर्वांनाच वाटत असते. पण धावपळीचे जगणे मात्र चुकत नाही.
यासाठी काय करता येईल यावरचे याचे साधे, सोपे उत्तर डॉ. कृष्णदेव गिरी यांनी 'मनसामर्थ्य'मधून दिले आहे. योगसाधना, मंत्रशक्ती, प्रार्थना, काव्य, सुविचार यावर मन केंद्रित केल्यावर आंनदी व निरोगी आयुष्य कसे जगता येते याबाबत मार्गदर्शन केले आहे. मन हे वाऱ्यासारखे असते.
त्याचे सामर्थ्य, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंत्रसामर्थ्याचा कसा उपयोग होतो, माळ जप, विविध मंत्र, स्तोत्र, देवाची स्तुती, त्याचा अर्थ व महत्व सांगतिले आहे. गुरु दीक्षा, बेल, भस्म, रुद्राक्ष, स्वस्ति, दीप प्रज्वलन, गंध, नारळ, शंखाचे महत्व, रत्नांचे सामर्थ्य, देवपूजा का व कशी करावी, देवपूजेतील वनस्पतीतील औषधी गुणधर्म व त्याचा वापर कसा करायचा, याची माहीती दिली आहे. तसेच देशभक्तीपर् गीते, प्रार्थना, भक्ती व बालगीते, सुविचार देऊन निसर्गाचे स्थान याविषयी सांगतिले आहे.