Summary of the Book
दहशतवादाच्या भस्मासुराने आज जगाला विळखा घातला आहे. हा भस्मासूर भारतावरही वारंवार हल्ले चढवत आहे. कधी आत्मघातकी स्पोट तर कधी दहशतवादी हल्ले घडवून देशाचे खच्चीकरण करण्याचे डाव आखले जात आहेत. भारत संपूर्ण ताकदीनिशी त्याचा मुकाबला करीत आहे. मात्र दहशतवादाचा समूळ नाहीनाट करण्यास अध्याप यश आलेलं नाही. ही एक जिहादी युती आहे आणि त्या युतीच्या अग्रस्थानी अल कायदा ही संघटना आहे, असं लेखक सुधारकर राजे सांगतात. या संघटनेला नेस्तनाबूत करण्यास अपयश आले कारण आपलं मूळ गाभ्याकडेच दुर्लक्ष करीत आहे, असं लेखक म्हणतात. या अपप्रवृत्तीला खतपाणी घालून जोपासण्यात आलं असं मत त्यांनी मांडलं आहे.