Summary of the Book
तत्त्वप्रणालींवरचा उडणारा विश्वास, ढासळणार्या श्रद्धा, अतिवेगाने अंगावर येणारे तंत्रज्ञान, छोट्या झालेल्या जगातही वाटणारे एकटेपण, त्यांतून उद्भवणारा पलायनवाद.
भूतकाळाकडे पाहून वर्तमानाचे स्वरूप ठरवता येत नाही; आणि इतिहास जेथे सांधा बदलताना जाणवतो, असा हा काळ. आत्मभान आणि परिस्थितिभान गोंधळाचे असण्याचा काळ. त्यातल्या राजीव आणि सदाशिव या दोन मित्रांची ही गोष्ट. आजच्या काळातल्या आणि समाजातल्या खोलवरच्या अंत:प्रवाहांची जाणीव करून देणारी. भविष्यातले महत्त्वाचे सामाजिक, तात्त्विक आणि मानसिक प्रश्न मांडणारी.
अनेक राष्ट्रीय महोत्सवांत समाविष्ट झालेले व लेखनाची पारितोषिके मिळालेले नाटक.