Summary of the Book
गावोगाव पसरलेले सडकांचे जाळे आणि डोंगरातील वाड्या-वस्त्यांचे स्थलांतर यांमुळे सह्याद्रीतील अनेक घाटवाटा आता क्वचितच वापरल्या जातात. डोंगरात खुंटे लावून, पावट्या खोदून केलेल्या, वाटा वापर नसल्याने साकारल्या जात नाहीत. कुठे दरडी कोसळून ह्या वाटा जवळ जवळ बंद पडल्यात जमा आहेत. राबता नसल्याने जंगल माजून झाकोळलेल्या वाटा, नेमका अंदाज बांधून शोधाव्या लागतात. अशा वाटांवरून जाताना कधी करवंदीच्या दाट जाळीत शिरायचे, तर कधी डोंगर उतारावरील वाळक्या कारवीच्या झुडपांचा आधार घेत घसपटत मार्गक्रमण करायचे. डोंगरदऱ्यात आडवे येणारे ओढे-नाले पार करायचे, तर कुठे दरड कोसळल्यामुळे तुटलेले कडे चढून जायचे. कधी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य, खडी चढाई, तर कधी लांबवर पसरलेले निर्मनुष्य जंगल किंवा छातीभर उंच वाढलेला गवताळ पठार पट्टा. सह्याद्रीचं असं एक अनोखं रूपच या घाटवाटांच्या प्रेमात पडलो तेव्हा सह्याद्रीने भरभरून हे सारे आमच्यासमोर उलगडले. स्नेहलच्या चोखंदळ वाचकांसाठी अनवट घाटवाटांची हि खास भेट.