Summary of the Book
प्रत्येक जण जीवनाचे ध्येय ठरवीत असतो. ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्नही केले जातात. मात्र सर्वोच्च ध्येयप्राप्तीसाठी स्व अनुभव प्राप्त करणे आवश्यक ठरते. तसेच कोणत्याही क्षेत्रांत यशस्वी होण्यासाठी योग्यवेळी, योग्य प्रकारे, योग्य प्रश्न विचारणेही महत्वाचे असते, असे सांगून सरश्री यांनी याबाबत 'साहसी जीवन कसं जगाल' या पुस्तकात मार्गदर्शन केले आहे.
हातिमताईच्या कथेद्वारे असे सात प्रश्न यात दिले आहेत. त्याची उत्तरे शोधण्याचे साहसी कार्य हातिमने केले. हे प्रश्न जाणून घेताना आपण आपल्या आयुष्याची त्याची तुलना करून त्यावर मनन - चिंतन करून शकतो. ते कसे शक्य आहे व त्यातून आयुष्याला कशी दिशा मिळेल, हे यात सांगितले आहे.
दुसऱ्या भागातही सात प्रश्न आहेत ज्याने माणसांचे व्यक्तिमत्व बदलू शकते. अशक्य कार्य शक्य कसे करावे यासाठी निसर्गता ताळमेळ साधणे, दुःखातून मुक्त होण्याचे रहस्य, निःस्वार्थी जीवनाचे फायदे, कर्मविज्ञान म्हणजे काय? कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळेल, परिपूर्ण आयुष्य कसे जगावे हे यातून समजून घेता येते. जन्म - मृत्यूचे रहस्यही जाणून घेता येते.