Summary of the Book
नवी नाटककारांची पिढी सतीश आळेकर, महेश एलकुंचवार, अजित दळवी, प्रशांत दळवी यांची ही आज जी गंभीर स्वरूपाची, कधी प्रायोगिक तर अधुनमधून व्यावसायिक नाटके लिहीत आहेत, त्या पहिल्या रांगेत आपल्या नाट्यकर्तृत्वाने प्रेमानंद गज्वी बसतात. त्यांचे लेखन तसे भरघोस झाले आहे असे म्हणता येत नाही. पाच नाटके आणि चार एकांकिकांचे संग्रह हे आतापर्यंत त्यांच्या नावावर जमा आहेत. त्यांची ‘तनमाजोरी’ आणि ‘किरवंत’ ही नाटके गाजलेली आहेत. ‘तनमाजोरी’चा एक प्रयोग ब्रिटनमध्ये लंडन येथे झाला.
दोन नाटकांना महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कारही मिळालेला आहे. तसेच राम गणेश गडकरी आणि चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिकेही लाभली आहेत. अन्य मान-शिफारशीही आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा की, प्रेमानंद गज्वी हे शुद्ध नाटककाराच्या भूमिकेतून आजचे एक महत्त्वाचे नाटककार आहेत.
- म. द. हातकणंगलेकर यांच्या प्रस्तावनेतून