Summary of the Book
गोव्याच्या भूमीत वाढलेल्या रुपाली मावजो - कीर्तनी यांना लग्नानंतर दहा वर्षे सौदी अरेबियात रहावे लागले. तब्बल दहा वर्षे अशा जगात राहायचे; जिथले वातावरण, कायदे, संकृती, जगण्याच्या पद्धती, सगळेच वेगळे. अशा विपरीत परिस्थितीला आनंदाने, सहज स्वीकारणे, तिथल्या लोकांना, पद्धतींना आपलेसे करणे व आपल्या समंजस स्त्री-स्वभावातून कुटुंबाला स्थैर्य देणे, समृद्ध करणे - हा प्रवास सोपा नव्हता. ह्या खडतर प्रवासाचे चित्रण लेखिकेने ओघवत्या शैलीत केले आहे. भारतीय मुक्त संस्कृतीत वाढलेल्या स्त्रीला अशा बंधमुक्त वातावरणात राहणे किती अवघड असते,कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागते, कोणते वेगळे व अनपेक्षित अनुभव येतात; हे जाणून घ्यायचे असेल तर रुपाली मावजो - कीर्तनी यांचे हे आत्मकथन वाचायलाच हवे.