Summary of the Book
मुनी नारद यांची मुख्य व्यक्तिरेखा तयार करून; पण त्याला आजच्या काळाचे सगळे संदर्भ देऊन अनिल सहस्त्रबुद्धे यांनी आठ कथा लिहिल्या आहेत. मानवाची प्रगती आणि त्यातून होणारे गोंधळ त्याचबरोबर मूलभूत बाबींचे होत असलेले विस्मरण याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. वैज्ञानिक व राजकीय महत्त्वाकांक्षा त्याला देवलोकातील कल्पित घडामोडींची जोड देऊन कथानकातील रंगत वाढवली आहे. विनोदी ढंगाच्या या कथा वाचकाला हसवतातही आणि अंतर्मुखही करतात.