Summary of the Book
कर्मसिद्धान्त म्हणजे काय, या प्रश्नाचा सखोल अभ्यास करून उद्धव कुलकर्णी यांनी हा गहन विषय अत्यंत सोप्या भाषेत इथे मांडला आहे. कर्मबंध आणि कर्मफलाच्या समस्त प्रक्रियेचे रहस्य प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे; म्हणजे आयुष्य सुखकारक होईल, असा दावा लेखक करतो. कर्मसिद्धान्ताच्या पालनामुळे मानसिक संतुलन राहील, कष्ट कमी जाणवतील आणि संकटे सहन करण्याची शक्ती मिळेल, असे सांगताना लेखक छोट्या छोट्या उदाहरणातून वाचकांचे प्रबोधन करतात.