Summary of the Book
निष्कलंक, धारदार, तेजस्वी आणि असामान्य बुद्धिमत्ता लाभलेले प्रतिभावंत, विश्वाचे कल्याण आणि मानवजातीची सेवा हे ध्येय मानून भारतमातेचा ओजस्वी अभिमान बाळगणारे, तीन भारतीय शास्त्रज्ञ नव्हे विज्ञानाचे थोर महर्षी सी. व्ही. रामन, मेघनाद साह्य आणि होमी जहांगीर भाभा यांनी देशासाठी केलेले कार्य, त्यांचे कर्तृत्व, त्यांचे संवेदनशील मन, या देशातील सामान्य माणूस विज्ञाननिष्ठ व्हावा आणि त्याचे जीवनमान उंच व्हावे म्हणून सेवानिवृत्ती स्वीकारून त्यांनी आयुष्यभर केलेली विज्ञान तपश्चर्या या पुस्तकात रघुनाथ मेटकरी यांनी अभ्यासपूर्ण पण; साध्या, सोप्या भाषेत मांडली आहे. कोण म्हणते शास्त्रज्ञ होणे अवघड आहे? जीवनातील अनेक कठीण परीक्षांना सामोरे जाऊन तीन महात्मे कसे थोर देशभक्त शास्त्रज्ञ बनतात आणि जगात मान्यता पावतात याची ही कहाणी आहे.
रघुनाथ मेटकरी यांनी लिहिलेली सर्वच पुस्तके विचारवंत ज्ञानी वाचक, रसिक, विध्यार्थी, पालक, शिक्षक यांना ओघवत्या भाषेने खिळवून ठेवणारी असतात. उस्तुकता आणि कुतूहल वाढविणारे हे पुस्तक मराठीच नव्हे, तर सर्व भारतीय माणसाला खूप आवडेल. आपल्याला वाटेल त्या क्षेत्रात यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीस हे पुस्तक प्रेरणा देईल.