aditya manjare
28/11/2015
एका लोकोत्तर व्यक्तीमत्वाचा शोध घेणारं गो. नी. दांडेकर यांचं हे अनोखं पुस्तक. श्रीसमर्थ रामदासाचं चरित्र सांगणारी ही रसाळ कादंबरी आहे. नारायणाच्या रूपानं हा प्रवास सुरु होतो. 'सावध रे सावध' या शब्दांनी त्याचं आयुष्य बदललं. धर्मशाळेत राहणं, माधुकरी मागणं, प्राचीन ग्रंथांचं वाचन असं वेगळं जीवन सुरु झालं. नारायणाचे रामदासस्वामी झाले. मग मुलांबरोबर हास्यविनोद, यतींसमवेत शास्त्रचर्चा, मुनींशी परमार्थचिंतन, एकांतात रघुवीरस्मरण असा दिनक्रम सुरु झाला. विरक्त आयुष्य जगणाऱ्या रामदासस्वामीनी देशाच्या संसाराची चिंता वाहिली. दासबोधसारख्या ग्रंथाची देणगी दिली. या साऱ्याची कथा पुन्हा पुन्हा वाचावी अशी !