Summary of the Book
भारताला प्राचीन इतिहास आहे. राजे-रजवाडे, त्यांच्या कहाण्या प्रत्येक भारतीय लहानपणापासून ऐकत आला आहे. पण सध्याच्या विज्ञानयुगात या इतिहासाचे दाखले वास्तवाच्या कसोटीवर जोखले जात आहेत. त्यामुळे रामायण, महाभारत झाले की नाही, यावर वाद उद्भवतात. प्रांतोप्राती असलेल्या ऐतिहासिक वास्तू, ताम्रपट, शिलालेख आदी भावनेच्या आधारावर नव्हे, तर वैज्ञानिक साधनांनी तपासले जाऊ लागले आहेत. असे पुरातत्त्व संशोधन, इतिहासाचे वाचन, अध्ययन, अध्यापन करताना जाणवलेल्या गोष्टी, मुद्दे म. श्री. माटे यांनी ‘अतीताची लेणी’मध्ये मांडले आहेत. इतिहासाचे अभ्यासक आणि जिज्ञासूंसाठी हे संशोधन उपयुक्त आहे.