Summary of the Book
ग्रामीण भागात बातमीदारी करणारे "सकाळ'चे बातमीदार सुरेश शहा यांनी आपल्या अनुभवांवर आधारित लिहिलेले हे पुस्तक ग्रामीण भागातील नवोदित बातमीदारांना मार्गदर्शक ठरेल. बातमीदारीच्या आड जर नगरसेवकपद येत असेल तर ते सोडून देईन, पण पत्रकारिता सोडणार नाही, इतक्या ठामपणे पत्रकारिता करणाऱ्या सुरेश शहा यांनी ग्रामीण भागात सामाजिक बांधिलकी ठेवून बातमीदारी केली. अनेक अनुभव त्यांनी त्या बातमीसह या पुस्तकात दिले आहेत. मोबाईल, इंटरनेटच्या आताच्या फास्ट युगापेक्षा शहा यांच्या काळात आव्हाने वेगळी आणि प्रचंड कष्टांचा असा तो काळ होता. निष्ठापूर्वक पत्रकारिता करणाऱ्या शहा यांचे पुस्तक म्हणूनच वेगळे आणि मार्गदर्शक असे आहे.