Summary of the Book
या पुस्तकातील रोमांचक अशा युद्धकथांतून लहान-थोर वाचकांना दर्शन घडते ते सेनानींच्या चातुर्याचे. कधी मानसशास्त्रीय युद्धतंत्राचा अवलंब करून तर कधी निसर्गाची साथ मिळवून कुशल सेनानी शत्रूवर कशी मात करतात, ते या कथा सांगतात.
शिवरायांसारखा असामान्य सेनानी मानसशास्त्रीय युद्धतंत्राचे डावपेच लढवून अफझलखानासारख्या प्रबळ शत्रूला आपल्याला सोयीच्या अशा रणक्षेत्रात खेचून तर आणतोच, शिवाय त्याच्या प्रचंड सैन्याचे तुकडे पाडून, अखेर युद्ध होणारच नाही असा भास निर्माण करतो आणि बेसावध शत्रूचा धुव्वा उडवितो तो निसर्गाची साथ घेऊनच.
महम्मद घोरी, पृथ्वीराज चौहान यांची फसवणूक करून, त्यांच्यावर कशी मात करतो, हे जसे या कथा सांगतात, तसेच पलटीचे युद्धतंत्र वापरून चंगीझखान आणि नंतर प्रतापराव गुजर, आपापल्या शत्रूवर कशी मात करतात, हेही सांगतात. 1965 च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तान, अमेरिकेने दिलेले अत्याधुनिक रणगाडे भारताच्या भूमीत घुसवित असताना, आपल्या सेनानींनीच्या चातुर्याचे दर्शन घडविणार्या या कथा सांगितल्या आहेत, युद्धशास्त्राचे अभ्यासक आणि पुणे विद्यापिठाचे याच विषयाचे व्याख्याते कॅप्टन राजा लिमये यांनी-आपल्या नेहमीच्या मनोवेधक शैलतून.