Summary of the Book
आपण कधीच सापडत नसतो
आपल्याला किंवा कुणालाही
नितीनच्या मनात सलणार्या या परात्मभावाचा उगम मूलतः प्रेमानुभवात आहे. म्हणूनच, कवीला मानवी जीवनातील एका विदारक, सर्वस्पर्शी जाणिवेपाशी नेऊन पोचवणारा त्याचा प्रेमानुभव, आणि त्याचा संदर्भ घेऊन लिहिलेली प्रेमकविता, या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या.
त्या फक्त स्वतःत पाझरून स्वतःत गोठत नाहीत, तर अवतीभवती पसरतात; तिथे रुजलेल्या अन्य काही जाणिवांशी एकरूप होतात…
प्रसरणशीलता हे या अनुभवाचे एक वैशिष्ट्य आहे आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्या अनुभवातील सच्चेपणा!
-विजया राजाध्यक्ष, (प्रस्तावनेमधून)