Summary of the Book
“भारतातील समाजव्यवस्था, अज्ञान, अंधश्रद्धा आणि कर्मकांडाच्या खोल गर्तेत अडकलेली असताना त्याला विवेकाचा दिवा दाखवण्याचे कार्य अनेक समाजसुधारकांनी केले. अनिष्ठ प्रथा, रूढी, परंपरा, अत्याचार, शोषण यावर प्रखर टीका, लेखन आणि प्रत्यक्ष चळवळी केल्या. विशेषतः आजच्या महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा समाजसुधारकांनी परिवर्तनवादी चळवळींमुळे घडलेला आहे. त्यांनी प्रज्वलित केलेल्या विचारप्रबोधानाच्या चळवळीची ज्योत आपणा सर्वाना प्रकाशाच्या वाटेवर घेऊन जाणारी...
त्याचं अपूर्ण कार्य पूर्ण करण्याची जाणीव करून देणारी आहे.” अशा स्वरुपाची वैचारिक मांडणी डॉ. नारायण कांबळे यांनी नव- सामाजिक चळवळी या ग्रंथातून केलेली आहे.