Summary of the Book
स्वातंत्र्यपूर्व काळात विस्कळीत, असंघटित आणि अशिक्षित असलेल्या आपल्या समाजातील उणिवा दूर करणार्या व देशाला स्वातंत्र्याच्या दिशेने नेणार्या निवडक व्यक्तींची चरित्रं.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्राप्रमाणेच अध्यात्म, साहित्य, विज्ञान या सर्व क्षेत्रांतील नामवंतांची ही चरित्रं शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्याप्रमाणेच कोणाही जिज्ञासू वाचकाला प्रेरक ठरतील. या पुस्तकात फिरोजशहा मेहता, श्री अरविंद घोष, वल्लभभाई पटेल, चक्रवर्ती राजगोपालाचारी, सरोजिनी नायडू, वि. दा. सावरकर, राजेंद्रप्रसाद, रासबिहारी बोस, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, सी. व्ही. रामन, मौलाना आझाद, जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे, सुभाषचंद्र बोस, श्यामाप्रसाद मुखर्जी, जयप्रकाश नारायण, लालबहादूर शास्त्री आणि राम मनोहर लोहिया या व्यक्तींच्या संक्षिप्त चरित्रांचा समावेश आहे.