Summary of the Book
माणसाच्या मनाचा व मानवी संबंधांचा खोलवर जाऊन वेध घेण्याचं सामर्थ्य हे वसंत नरहरांच्या कथांचं एक वैशिष्ट्य. या संग्रहातील कथांतूनही त्याचा प्रत्यय यावा.
या संग्रहातील प्रत्येक कथेचा आवाका, अभिव्यक्ती व वातावरण भिन्न भिन्न; मात्र या सर्वात एक आंतरिक सूत्र आहे. ते आहे मानवी नातेसंबंधांच्या विशिष्ट दशेचं.
जन्मदाते, जन्मभूमी, भावंडं आदींशी असलेली जन्मसिद्ध नाती; मैत्री, प्रीती आणि नीति व मूल्यविचार आदींशी असलेली साधित नाती; त्याचप्रमाणे सहसा लक्षात न येणारं व्यक्तिमात्राचं ‘स्व’शी असलेलं नातं अशी ही विविध नाती. या संग्रहातील कथांत माणूस व त्याचा देश यांपासून माणूस व त्याचा ‘स्व’पर्यंत अनेकविध नात्यांना आलेली निर्वासित सदृश कळा दिसून येते.
या संग्रहातील एका कथेतील पात्राचे उद्गार आहेत, ‘‘माणसाबद्दल ठामपणे एकच सांगता येतं, की माणसाबद्दल ठामपणे काहीच सांगता येत नाही.’’ याचा प्रत्यय वाचकांना या कथांतून यावा.
- उमाकांत ठोमरे