Summary of the Book
मन उदास करून टाकणारे, बरेच विषय ग्रामीण भागात सर्वत्र भरून उरलेले आहेत. काळीज केळीच्या पानासारखं चिरत नेणारा, जीवनाचं वास्तव चित्र, दु:ख, दैन्य, दारिद्र्य, उपासमार ह्या सर्वांना बरोबर घेऊन जगत असतांना इतकं सारं आपण भोगतोय तरीही देवीचा कोप होईल, ह्या समजुतीने फुलात रुपांतर होण्यापूर्वी कळ्या खुडून देवाच्या नावावर सोडल्या जातात आणि मग वासनांध झालेला समाज त्यांना आपल्या रक्ताळलेल्या टाचांनी हवे तसा रगडतो हे विदारक वास्तव सुन्न करून टाकत.