Summary of the Book
संतसाहित्याचे अभ्यासक यशवंत साधू यांचा हा संतसाहित्यावरील लेखांचा संग्रह. यात एकंदर २३ लेख असून ते वेळोवेळी लिहिलेले- म्हणजेच प्रासंगिक स्वरूपाचे आहेत. संतसाहित्य हाच लेखन-मननाचा विषय असल्याने त्याविषयीची वेळोवेळी केलेली ही टिपणे आहेत. वाचकांच्या सोयीसाठी त्यांची समीक्षा, चिंतन, चर्चा आणि वारसा अशा चार भागांत विभागणी केलेली आहे. सततच्या वाचनातून मनात निर्माण झालेले विचार लेखकाने या संग्रहातील लेखांतून नोंदवले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, संतसाहित्यातील सौंदर्याचे, त्यातील अध्यात्माचे चिंतन करता करता लेखक आवर्तात सापडतो. त्यातून त्याला बाहेर पडता येत नाही. अशा या आवर्ताची ही साखळी. पण यातले सर्वच लेख काही संतसाहित्याविषयीचे नाहीत, ते अध्यात्माविषयीचेही आहेत. हा फरक लेखकाने केलेला नाही. वाचकांनी तो केलेला बरा.