Summary of the Book
वडार या भटक्या-विमुक्त जातीत झालेला जन्म, लहानपणी भूक, उपासमार, अपमानाशी केलेला सामना, अशा प्रतिकूल परिस्थितीत केलेले शिक्षण, नंतर केलेले लेखन या सगळ्या प्रवासात झालेल्या जडणघडणीचे कथन रामचंद्र नलावडे यांनी या आत्मचरित्रात केले आहे. 'रक्तचंदनाची बाहुली स्वतः झिजून वेदनादायी जखमा बऱ्या करून आनंद देण्याचं काम करीत असते.
अलीकडील काळात असचं जगणं माझ्याही वाट्याला आलं होतं. माझ्या वाट्याला आलेलं आयुष्य अगदी प्रांजळपणे या आत्मकथनात मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे,' असे ते सांगतात. नलावडे यांच्या वैयक्तिक प्रवासाबरोबरच वडार समाजाच्या स्थिती आणि गतीचे दर्शनही या कथनातून घडते. निरक्षर आई-वडिलांच्या पोटी जन्म घेऊन लेखनात यश मिळवलेल्या लेखकाची ही आगळी कहाणी.