Summary of the Book
मराठी भाषेच्या शुद्धलेखनासंबंधी आणि तिच्या वापरासंबंधी अत्यंत जागरूक असणाऱ्या सत्त्वशीला सामंत यांच्या लेखांचं संकलन या पुस्तकात करण्यात आलं आहे. भाषा आणि शुद्धलेखनाचे नियम याविषयी सातत्यानं आपली मतं त्यांनी विविध लेखांतून मांडली. आठ भागांत या पुस्तकातील लेखांचं विभाजन करण्यात आलं आहे. भाषांतर करताना काय काळजी घ्यावी, तसेच भाषेचा वापर आणि प्रसारमाध्यमांतून भाषेचा घसरत असलेला दर्जा यासंबंधी त्यांनी परखड मत या लेखातून मांडली आहेत. डॉ. मीरा घांडगे यांनी या पुस्तकाचं संपादन केलं आहे. अभ्यासक आणि मराठीविषयी आस्था असणाऱ्या सर्वांना हे लेख आवडतील.