Summary of the Book
आयुष्यात अनेकांशी परिचय होत असतो. काही जणांशी चांगली मैत्री होते. तर काहींचा थोड्या काळासाठी सहवास घडतो. अशा संबंधावर आधारित 'सुरबाला' हा कथासंग्रह सुभाष मुरलीधार कर्णिक यांनी लिहिला आहे. यातील 'शाली' ही कथा सत्यघटनेवर आधारित आहे.
बिनधास्त, फटकळ शालीची खूप वर्षांनी भेट झाल्यावर तिचे मनोहारी भावविश्व, नात्यांची जपणूक, सुनेसाठी असलेला मातृभाव लेखकाच्या मनाला भावतो.'दुबईची बेटी'मधील इंदूच्या वाटेला आलेले दुर्दैव त्यांच्या मनाला लागते.
घरातील आर्थिक संकट दूर व्हावे म्हणून आपल्या स्वप्नांचा बळी देऊन वडिलांच्या वयाच्या वासूअण्णा सावकार यांच्याबरोबर विवाह करणारी यशोदा, 'हॅलो१९८'मधील वैजयंती व सुहास कुलकर्णी, 'बकुळीची फुले'मधील सौरभ व सुजाता, जागावेगळा'तील रिमा व प्रकाश, अरुण, सलमा, 'न्यायदेवतेचे आसू'मधील बसू या कथांमधून नात्यांमधील ओलावा, सच्चेपणा दाखविला आहे, तर 'सुरबाला'कथेतून एक वेश्येची दुर्दैवी कहाणी समोर येते.