Summary of the Book
'कविता म्हणजे समर्थ भावनांचा शब्दरूप आविष्कार . या व्याख्येला अनुरूप अशा श्री. गोपीचंद बोरकर यांच्या आणि त्यांच्या विषयीच्या कवितांचा हा संग्रह पहिला , वाचला आणि आवडल. अनेक कविता या प्रासंगिक वाटण्यासारख्या आहेत; तथापि त्या प्रसंगातील भावना आणि आविष्कार यांची उंची यांना गौण लेखावे, असे मुळीच वाटत नाही. या निकषावर या सर्व कवितांना उंची आहे; श्री. गोपीचंद बोरकर यांना भावनाशील कवी म्हणून ओळखावे लागेल.त्यांच्या सर्व कविता एकसंध वाचाव्यात म्हणजे कवितांना असणारा ताल जाणवू लागतो. जन्मभूमी, कर्मभूमी, कुटुंब, सहकारी आणि विद्यार्थी यांच्याविषयीच्या आपुलकीमधून, डळमळत्या अपेक्षांमधून अस्वस्थ भावना चहुदिशांनी आणि वर खाली होत असताना आढळतात. त्यातला स्नेहाचा धागा शोधावा लागतो. तोअसतोच; पण प्रकट नसतो एवढेच.
समसंवेदी कवी आणि कवयित्री यांच्या कवितांना याचसंग्रहात स्थान देऊन त्यांनी त्यांच्या संवेदनांचे स्वागत केले आहे.
'कवी करीतसे काव्य, रसिका रमविण्यास जे|
सहसंवेदना त्यांची उभयां जगवीतसे ||
आपल्या सभोवतालच्या विश्वाला कृतज्ञतापूर्वक वंदन करणाऱ्या कवी श्री. गोपीचंद बोरकरांना मनःपूर्वक शुभेच्छा !