Summary of the Book
आज स्त्री विश्वात झालेली प्रगती लक्षणीय असली, तरी एक कल असा होता, की स्त्रियांचे स्थान केवळ स्वयंपाकघरातच होते. तरीही त्यावेळच्या परिस्थितीतही स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या स्त्रिया होत्या. अशाच एका स्त्रीची कहानी नेहा कुलकर्णी यांनी या छोटेखानी कादंबरीतून रेखाटली आहे. हा कल १९३० -४० चा आहे. बकुळाने त्या काळातील प्रथा मोडून नऊवारी सीडीऐवजी पाचवारी साडी नेसली, सायंकाळ चळवळी, घर जाळायला आलेल्यांच्या समोर बंदूक घेऊन उभी राहिली.
विघ्नेश्वराची कृपा असणारी, अभ्यंकरवाड्यात राहणारी, पत्नी या नात्याने त्र्यंबकच्या जीवनात प्रवेश करणारी, इनामदारांच्या उमावहिनी म्हणून वावरणारी, संकटांना सामोरी जाणारी, पुन्हा नवी सुरुवात करणारी आणि अखेरीस गावाची माईआजी अशी ओळख निर्माण करणारी अशी बकुळाची विविध रूपे या कहाणीत दिसतात.