Summary of the Book
अशिक्षण, दारू, चोऱ्यामाऱ्या आणि रुढीपरंपरेची उदई म्हणजे वाळवी लागलेला पारधी समाज आजही बहुतांश त्याच मानसिकतेत जगतो आहे. अशा या शापित समाजातील एक बाप आपल्या मुलाच्या शिक्षणाचा ध्यास धरतो. मुलाच्या शिक्षणासाठी सारे कष्ट झेलतो. मुलाला मात्र शिक्षणाचा तिटकारा आहे. रडतखडत मुलगा दहावीपर्यंत पोचतो. दहावी नापास झाल्यावर बाप मुलाचं नाव टाकतो. येता-जाता साऱ्यांसमोर मुलाला बॉल लावतो. बापाचं हेच वागणं मुलात जिद्द निर्माण करतं. मुलगा पदवीधर होतो. शिक्षणाचं महत्व समजतो आणि समाजातील लोकांनाही शिक्षणासाठी प्रवृत्त करू लागतो.
अशिक्षित आणि दुर्लक्षित समाजातल्या मुला-बापातला हा संघर्ष. त्यासोबत आहे पारधी जीवनाचं भेदक वास्तव.