Summary of the Book
लालजी पेंडसे यांनी १९६२ च्या सुमारास महाराष्ट्राचे महामंथन हा ग्रंथ लिहून पूर्ण केला, तेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ नुकतीच होऊन गेली होती. तिचे अक्षर इतिहासात रुपांतर करण्याचे मोठे कार्य लालजी पेंडसे यांनी केले. प्रगतीशील प्रारंभापासून अखेरपर्यंत ते पहिल्या फळीतील नेते म्हणून सक्रीय होते. कार्यकर्त्यानेच आपल्या चळवळीचा इतिहास लिहावा याला एक वेगळे महत्व आहे. या इतिहासाचे कथान त्यांनी घटनांच्या वर्णन-विश्लेषणासोबतच, संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बैठकांचे वृतांत अहवाल, चर्चांचे तपशील, वृत्तपत्रांतील बातम्या यांच्या माध्यमातून केले आहे. यामुळे हा इतिहास पुरेसा निःपक्षपाती तर ठरला आहेच, पण भविष्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अभ्यास करणाऱ्याला अभ्यासकाला, जिज्ञासू व्यक्तीला अत्यंत उपयुक्त असणारा दस्तऐवज म्हणूनही त्याचे महत्व आहे.