Summary of the Book
पन्नास वर्षांची वाटचाल हि थोडीथोडकी नसते. अनेक अनुभवांची, माणसांची, नात्यांची सोबत या वाटचालीला लाभली असते. सुहासिनी मथुरे यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनातील या पन्नास वर्षांच्या वाटचालीवर आधारित हे पुस्तक लिहिले आहे. त्यांचे पती हेमचंद्र मथुरे यांच्या निधनानंतर हे लेखन केल्याने ते आठवणीवजा आहे. प्रारंभी त्यांनी आपले बालपण व तरुणपणाच्या आठवणी सांगितल्या आहेत.
विवाहानंतर त्यांचे आयुष्यच बदलून गेले. पतीच्या समृद्ध सहवासात त्यांनी देश - परदेशात भ्रमंती केली. हे सर्व अनुभव पुस्तकात आहेत. एकीकडे वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी, प्रसंग, सुख-दुःखे, ताणतणाव आणि दुसरीकडे भटकंतीचा अनुभव अशा दोन स्तरांवर ही वाटचाल समोर येते.