Summary of the Book
एखादी अभिव्यक्ती वा नवनिर्मिती आपल्या जीवनाचे सारत्त्व घेऊनच येत असते.... सदर कवितासंग्रहात कवयित्रीचा अंत : स्वर ... तिचा आतला आवाज ... मुखरित झालेला आहे. तिचं हे प्रस्फुटीत होण... अत्यंत परिपक्व स्वरूपाचं आहे. जीवनाकडे बघण्याच्या तिच्या दृष्टीकोनात परिपक्वता आहे ... समंजस दृष्टी आहे. त्यांच्या कविता जीवनातील काही सुंदरसं हरवल्याच्या ... त्याच्या परीपुर्तीच्या प्रतीक्षेत असल्या ; तरी त्यातील समंजस स्वर ....' पाहता वाटुली शिणले डोळुले' ... असे म्हणत ... अंतर्यामाला समजावीत धीर देणारा आहे. समजावणीचा सकार इतका प्रभावी आहे की, निराशेचे मळभ दाटतच नाही .... हरपल्या श्रेयाची पुनर्भेट घडविण्याची ताकद कावियीत्रींच्या .... अर्थात काव्यगत नायिकेच्या अंत : स्वरात आहे.