Summary of the Book
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे मौलिक विचार या पुस्तकातून भक्तांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रकाश कृष्णाजी काळे यांनी पुस्तकाचे संकलन केले आहे. सर्वप्रथम पुस्तकाचे प्रयोजन सांगून नंतर त्याची मांडणी करण्यात आली आहे. आध्यात्मशास्त्र, उपासना, चित्तशुद्धी आदींचे महत्व सांगून स्वामींचे संदेश उद्धृत केले आहे. ज्ञान ग्रहण केल्याशिवाय सदाचार प्रस्थापित होणे अवघड असते, म्हणून नव्या पिढीने वैज्ञानिक दृष्टीकोनातून परमेश्वर नियंत्रण समजावून घ्यायला हवे. त्य दृष्टीने अनेक संकल्पना आणि सिद्धांतांची उकल पुस्तकात करण्यात आली आहे. 'भिऊ नकोस मी पाठीशी आहे' हा संदेश स्वामिनी दिला आहे. हा संदेश भयापासून मुक्ती देणारा आहे.